पालघर दि. 30 मार्च: पालघर जिल्ह्यामध्ये आज रोजी (30 मार्च) परदेशात प्रवास केलेल्या किंवा अशा व्यक्तीच्या सहवासामुळे देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींची संख्या 24 तासांत 103 ने वाढून 842 झाली आहे. त्यातील 60 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची संख्या 25 इतकीच कायम आहे. यातील तब्बल 336 व्यक्तींचा देखरेखीखाली 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.
कोरोनाबाधेची शंका आल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 4 ने वाढून 43 झाली आहे. त्यातील 22 जण हे विदेशवारी केलेले असून, अन्य विदेशवारी न केलेल्या 21 जणांमध्ये तीव्र श्वसन विकाराची लक्षणे आढळली असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या 11 निकटवर्तीयांसह (22+21+11) एकूण 54 जणांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
त्यातील 43 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 38 अहवाल निगेटिव्ह आले असून 6 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले सर्व 6 रुग्ण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून ते मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
• डहाणू: तालुक्यात 44 जण देखरेखीखाली असून त्यातील 26 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• पालघर: तालुक्यात 108 जण देखरेखीखाली असून त्यातील 75 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• जव्हार: तालुक्यात श्वसन विकाराने त्रस्त एक जण रुग्णालयात दाखल आहे. त्याचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. या आधी 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• मोखाडा: येथेही तीव्र श्वसनविकाराचा 1 रुग्ण आढळून आला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून नवीन नोंद नाही.
• तलासरी: तालुक्यात 23 जण देखरेखीखाली असून त्यातील केवळ 1 जणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही.
• वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्याची आकडेवारी सतत वाढत असून आज रोजी (ग्रामीण भागात 140 + महानगर क्षेत्रात 500) 640 जण देखरेखीखाली आहेत. त्यातील 216 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेले 11, तीव्र श्वसन विकाराचे 10 व कोरोना बाधीत रुग्णांचे निकटवर्ती 11 असे 32 जणांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 6 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अन्य 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.
या क्षणी (दिनांक: 30 मार्च 2020) सरकारी संकेतस्थळावरील माहिती अशी आहे.
देशभरात एकूण 1263 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 204 जण पूर्णत: बरे झाले असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 215 झाली असून 25 जण पूर्णत: बरे झाले आहेत. 9 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र हे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू होणारे राज्य ठरले आहे.
त्याखालोखाल गुजरात राज्यामध्ये कोरोनामुळे दुसऱ्या क्रमांकाचे 6 मृत्यू झाले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 69 झाली आहे.
देशामध्ये सर्वाधिक कोरोना बाधीतांची संख्या केरळमध्ये 234 असून 20 जण पूर्णत: बरे झाले आहेत. मृत्यूची संख्या 1 वर रोखलेली आहे.